Sunday, January 2, 2011

आज क्रांतीज्योती सावित्रीआई जयंती,विनम्र अभिवादन..

खामगावात सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

सांगलीत ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

सांगलीत ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव



सांगली, २९ डिसेंबर / प्रतिनिधी
मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत सलग दहा दिवस सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती आशा पाटील यांनी दिली.
सोमवार, दि. ३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांच्याहस्ते या सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्याचदिवशी श्रीमती स्वाती शिंदे-पवार ‘२१ व्या शतकातील महिला’, दि. ४ जानेवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास पाटील ‘महिलांचे उद्योग व मार्गदर्शन’, तर दि. ५ जानेवारी रोजी गौतम पाटील ‘महाराष्ट्रीय लोककला’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दि. ६ जानेवारी रोजी महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, तर दि. ७ जानेवारी रोजी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन सोनिया मदन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या आरोग्य शिबिरात दात, हाडांचा ठिसूळपणा व हिमोग्लोबीन तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
शनिवार, दि. ८ जानेवारी रोजी १० ते १४ या वयोगटातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दि. ९ जानेवारी रोजी मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वधू-वर मेळावा होणार आहे. दि. १० जानेवारी रोजी अ‍ॅड. शोभा चव्हाण ‘कायदा’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून दि. ११ जानेवारी रोजी ‘स्वसंरक्षण’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा होतील. बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी ऐश्वर्या प्रतीक पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असल्याचेही श्रीमती आशा पाटील यांनी सांगितले.

जिजाऊ-सावित्री व्याख्यानमाला 2010 Nilanga

महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका - बनबरे



निलंगा, ८ जानेवारी/वार्ताहर
लोककल्याणकारी व समतेचे राज्य निर्माण करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनी मानवाच्या मुक्तीसाठी लढा दिला आहे. त्यामुळे संकुचित विचाराच्या मानसिकतेतून महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका, असे आवाहन लेखक गंगाधर बनबरे यांनी केले.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांनीफार्मसी महाविद्यालयात जिजाऊ-सावित्री व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात श्री. बनबेरे बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एल. एरंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लिंबराज सूर्यवंशी, श्रीमती वनीता काळे उपस्थित होत्या.
श्री. बनबरे म्हणाले की, महापुरुषांच्या विचारामुळे अनेक राष्ट्रे विकसित झाली; परंतु ज्यांच्या शरीरात महापुरुषांचे रक्त आहे, तो भारतीय शेतकरी आत्महत्या करत आहे ही बाब खेदजनक आहे. बहुजन समाजातील भावनिक संघर्षांचे मूळ अज्ञानात आहे त्यामुळे ताकद असूनही मस्तक नसल्याने बहुजन गलितगात्र झाला आहे. बहुजनांची विद्येची देवता सरस्वती नसून सावित्री आहे. कारण फुले दांपत्यामुळेच बहुजन समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. मराठा बहुजन समाजाला खरा शत्रू कोण, हे न समजल्याने तो आपसातच संघर्ष करीत आहे. आगामी लढाई ढाल, तलवारीची नसून बुद्धीची आहे हे ओळखून शिक्षणाची कास धरावी, असेही ते म्हणाले.
श्री. धुमाळ, प्राचार्य एरंडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक एम. एम. जाधव यांनी, सूत्रसंचालन प्रा. हंसराज भोसले यांनी केले. दिलीप धुमाळ यांनी आभार मानले.

Saturday, January 3, 2009